माणसाने माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकीस सांभाळणे.
परन्तु , माणुसच जर राक्षसासारखी वागणुक करायला लागला तर ?
कित्येकदा माणसाला सांगावे लागते : माणसा! माणसासारखे वाग.
हे सांगुन जो माणसांमध्ये परिवर्तन घडवून आणतो त्यास " त्या " माणसाचा गुरु असे म्हटले जाते.
जीवनात राक्षसी वृत्तीचे लोक खुप आहेत त्यांना सुधारावयाला हवे, साध्या साध्या गोष्टीतून त्यांचे विचार बदलायला हवेत।
प्रत्येकाने आपल्या आसपासच्या लोकांमधील वाईट वृत्तीना मुठमाती दिली पाहिजे तरच आपण आणि आपला परिसर आपण सुधारल्याचा आनंद आपणास मिळेल आणि तो आनंद दिर्घकाळ टिकेल.