Friday, September 16, 2011

मलाही वाटतं .....

या धावत्या जगात
क्षणभर तरी आरामात बसावं ,
मलाही वाटतं एक दिवस
बिल्कुल शांत रहावं .

ना कुणाची ट्रिंग ट्रिंग
ना कुणाचे व्हायब्रेशन ,
वर्षातून एकदातरी
आपणही करावं सेलिब्रेशन .

ना कुणाच्या हाती लागावं
ना कुणाच्या कानी ,
एक दिवस का होईना
विसरावी सर्वांचीच वाणी .

केलेले Dialled Calls
झालेले Missed Calls
आलेले Received Calls
सगळं काही विसरावं,
मलाही वाटतं एक दिवस
बिल्कुल शांत रहावं .

Monday, September 12, 2011

प्रेमात पडू लागल्यावर

आठवणींचा कहर होतो
सद्गुणांना बहर येतो,
सगळे काही पवित्र वाटू लागते
प्रेमात पडू लागल्यावर .

तहान विरून जाते
भूक हरपून जाते,
सगळे काही विसरायला होते
प्रेमात पडू लागल्यावर .

शब्द मुके होतात
विरह नकोसा होतो,
सतत सोबत रहावेसे वाटते
प्रेमात पडू लागल्यावर .

जग जिंकायचे आहे
बरेच काही कमवायचे आहे,
हे असे वेड्यासारखे होऊ लागते
प्रेमात पडू लागल्यावर .

Friday, July 29, 2011

सुनिल जगदाळे आणि परिवार

नमस्कार मित्रांनो ,
नवी मुंबई मधील नवीन चैनल city9 वर मी आणि माझी फॅमिली येत
आहोत. जाहिरात दाखवायला सुरुवात झाली आहे.पूर्ण कार्यक्र माची तारीख अझुन नक्की झाली नाही ती आपणास नंतर कळवेन सध्या सदरची जहिरातिची क्लिप पहा.
धन्यवाद.



http://www.youtube.com/watch?v=GkqqdBhEsZw&feature=share

Thursday, July 28, 2011

आधार कार्ड

UID CARD हे असे असेल आणि सर्वाना ते सक्तीचे असेल . महाराष्ट्रात "यु आय डी" अथवा "आधार कार्ड " प्रत्येकाला दिले जाणार आहे. हे कार्ड बहु-उद्देशीय असून याचा उपयोग आर्थिक आणि सामाजिक कामासाठी होणार आहे. या कार्ड प्रकारात २ कार्ड असणार आहेत १. सिटिझनशिप कार्ड आणि २. नॉन सिटिझनशिप कार्ड. दोन्ही कार्डाचा रंग आणि आकार वेगवेगळा असणार आहे. नॉन-सिटिझनशिप कार्ड हे विदेशीयांना ठराविक काळापुरते द्यावे लागणार आहे.
हे कार्ड सर्वाना सक्तीचे असणार आहे.
यासाठी नागरिकाला पालिकेने जाहिर केलेल्या केंद्रावर जावे लागणार आहे आणि तेथे
१. ओळखीचा
२. राहण्याच्या पत्त्याचा
३. जन्मदिनांकाचा
पुरावा द्यावा लागणार आहे.

केंद्रावर हे पेपर तपासून झाल्यावर नागरिकाच्या हाताच्या दहाही बोटांचे ठसे घेतले जातील आणि प्रत्येकाच्या डोळंयाचे स्कँनिंग केले जाईल.

या
सर्व माहितीच्या आधारावर शासनाकडून १२ अंकी ओळख क्रमांक देण्यात येईल. हा क्रमांक प्रत्येकाला त्याच्या घरी पोस्ट टपालाने कळविण्यात येणार आहे.
या कार्ड साठी नागरिकाला कोणत्याही प्रकारची "फी" भरावी लागणार नाही.

Monday, July 11, 2011

वो दिन

२६ जुलाई का दिन सबको रहेगा याद ,
एक नही दो नही सौ साल बाद।
बारिश की वजह से सब थे परेशान,
अपने ही लोगों से बन गए थे अनजान।
किसी को किसी की ख़बर नही मिलती थी,
टेलीफोन तथा मोबाइल की लाईने नही चलती थी।
हर तरफ़ से मुम्बई पानी मे डूब गयी,
एक पल ऐसा लगा जैसे धड़कन रुक गयी।
कितने लोग लापता हो गए कितने हो गए घायल,
जिनके घर उजड़ गए वे तो हो गए पागल।
ऐसे मे इंसानियत ने हाथ बढाया,
जाती -धर्म तोड़कर मौत से छुड़ाया।
सलाम करते है उनको, जिन्होंने जाँबाजी दिखाई,
सर पे मौत का कफन लेके दूसरों की जान बचाई।
यही प्रार्थना ईश्वर से सबको रखना आबाद,
२६ जुलाई का दिन सबको रहेगा याद।
ईश्वर करे ऐसा दिन कभी ना आए,
दुखों के ऐसे बाढ़ किसी को ना दिखाए।

- सुनील जगदाले

Saturday, March 19, 2011

हार्दिक शुभेच्छा



रंगीन होळीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

Friday, February 4, 2011

मी वाट पाहते


तुझ्याकडे येताना
मला आवर्जुन ऊशीरा यायचय,
तू बेचैन झालेली मला
दुरून चोरून पहायचय।